मुंबईहून आलेला जावाई घरात ठेवला लपवून !
- प्रशासनाला चार दिवसांपासून पत्ताच नाही.
- मांजरा कारखान्याच्या कॉलनीत खळबळ
लातुर : ( व्यंकट पनाळे)
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कर्मचारी यांनी मुंबई येथुन चार दिवसापूर्वी लातूरला आलेले जावयास कोणालाही न कळु देता, मांजरा कॉलनीत लपवुन ठेवल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या कामगाराचे जावाई हे मुंबई कडे पालघर भागात रहातात. ते चार दिवसापुर्वी मुंबई येथुन लॉकडाऊन असताना लातुरला आलेच कसे ? आणि त्यांनी प्रशासनाला न सांगता चार दिवस जावायास घरात लपवुन ठेवलेच कसे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
जावाई घरी आल्यापासुन सासु सासरे असलेल्या या पती-पत्नीचा घराबाहेर किराणा दुकानदार, पिठाची गिरणी, अशा ठिकानी बारा नंबर पाटी, शाम नगर येथे किती ठिकाणी संपर्क झाला असेल. त्यांच्या संपर्कात किती लोक आले, हे पाहणे प्रशासना पुढे आव्हान आहे.
आज सकाळी लपवलेल्या जावाईबुवाला खोकला घरात बसु देईना त्यामुळे हे बिंग उघडे पडले.
आता जावयास शासकिय रुग्णालयात दाखल केले असुन मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे. तुर्त मांजरा कारखान्याच्या मांजरा कॉलनीत भीतीचे वातावरण आहे.
- व्यंकट पनाळे, पत्रकार, लातूर. ९४२२०७२९४८