टरबूज विक्रीतून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी- ओमकार टाले
जळकोट : शेतकरी जगाचा पोशिंदा या म्हणीप्रमाणे जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी माधव दत्तात्रेय जाधव यांनी आपल्या 2.10 हेक्टर शेता मध्ये वेगवेगळ्या योजनेचा अवलंब करून आर्थिक परिस्थिती सुधार वलेली आहे सन 2017 18 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी समूहाच्या वतीने सामूहिक शेततळे ठिबक सिंचन M R E G S (नरेगा ) अंतर्गत फळबाग लागवड 5×5 मी अंतरावर केसर आंबा घेतलेला आहे व उरलेल्या जमिनीत त्यांनी टरबुजाची लागवड केली होती पण टरबुजाचे उत्पन्न सुरू होताच कोरोना या रोगाने थैमान घातले यामुळे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन झाल्यामुळे टरबूज तसाच शेतामध्ये राहिला त्यावेळी शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी शेतातील टरबूज विकण्याचा कृषी अधिकारी पवार साहेब यांच्याकडून पास घेतला व तो टरबुज अहमदपूर येथे नेऊन विकण्यास सुरुवात केली प्रत्येक 1किलो टरबूजातुन जे पैसे येतात त्यातील एक किलो मागे एक रुपया हा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे ठरवले कारण आज कोरोना या महामारी रोगाच्या थैमानामुळे जे राज्यावर आर्थिक संकट आलेले आहे त्यामुळे आपण हि समाजाचे देणे लागतो या भावणेणे विकलेल्या टरबुजातुन मिळनारी रक्कम ही जळकोट चे तहसीलदार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत पाठविनार असल्याचे महाराष्ट्र 24आवाज न्युज सी बोलताना शेतकर्याने सांगितले. यावेळी जळकोट तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळधिकारी बोरकुरे मॅडम व कृषी सहाय्यक वनामे मॅडम तसेच कृषीमित्र संभाजी मोरे हे उपस्थित होते