पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला.
पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांची लावणीला सुरुवात.
महाराष्ट्र 24 आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) आषाढी एकादशीपासून पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवल होत.मात्र आषाढी एकादशीला जणू पांडुरंगाने बळीराजावर आलेले संकट दूर केल्या प्रमाणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाल्याने तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे.आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी पांडुरंगच धावून आल्याचे समाधान बळीराजाच्या चेहऱ्यावर उमटले.