एनजीओ सर्पमित्राने तीन तासाच्या प्रयत्नानंतर दोन तोंडाचा साप केला रेस्क्यू
महाराष्ट्र २४ आवाज
राजेंद्र वाटाणे
अमरावती जिल्ह्यामध्ये गेली तीन दिवसापासून रिमझिम पावसाच्या झडीने सुरवात
केली असून या पावसामध्ये साप जंगलामधून मानवी वस्ती मध्ये जास्त प्रमाणात दाखल होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना सर्पदंश झाल्याने जीव सुद्धा गमावावा लागला ग्रामीण भागांमध्ये जास्त करून विषारी, निम विषारी, बिन विषारी सापाची ग्रामीण भागामध्ये ओळख नसल्या कारणामुळे बरेचदा सापांना मानवाचा मुक्या प्राण्यांचा शत्रू म्हणून जिवाने मारल्या जाते, परंतु माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना अचलपूर तालुका डिजिटल ग्रामपंचायत परसापुर येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये दोन तोंडाचा नावाचा आढल्यामुळे तेथील शेतकरी सर्पमित्राने लव इंडिया फॉरेस्ट इन्व्हरमेंट या सर्प मित्र ला फोन करून बोलावले आणि ज्या ठिकाणी दोन तोंडाचा साप सापडला ते घर अक्षरशः पूर्ण कोठार आणि भरलेले होते त्या घरांमध्ये तीन तासाचे अथक प्रयत्नाने कुठार बाहेर काढून सापाला रेस्क्यू करून व प्रादेशिक विभाग परतवाडा यांच्या स्वाधीन करण्यात आले.
घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी दोन तोंड्या सापाला सोडण्यात आले सर्पमित्र विजय तायडे मोबाईल नंबर 98 90 97 65 53 टिळक यादव, निखिल आठवले, सागर पेंढारकर सोमेश ब्राह्मणे आदींनी परिश्रम घेऊन सापाला घनदाट जंगलामध्ये सोडले आहे.