रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा


महाराष्ट्र २४ आवाज



रायगड : (नितीन लोखंडे )प्रादेशीक हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार २१ व २२ सष्टेबर २०२० या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे, इलेक्ट्रीक बोर्ड, विजेचे खांब यांपासून नागरीकांनी दुर उभे रहावे. नागरीकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.संपूर्ण जगावर असलेले कोरोनाचे संकट, कोकणात आलेले निसर्ग चक्रीवादळाचे संकट आणि आता परतीच्या पावसामध्ये दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा या सर्व संकटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टिमुळे उभ्या भात पिकांचे नुकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हातातून निघून जाणार या विवंचणेन इथला शेतकरी चिंताग्रस्थ आहे. लाॅकडाऊनमुळे बंद पडलेले लोकांचे रोजगार हाताला काम मिळत नाही निसर्गाचे एकामागून - एक आलेले संकट त्यामुळे आता जगावे कसे असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडलेला आहे. अतिवृष्टीमुळे नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image