उत्तर प्रदेश सरकार व मोदी सरकार बरखास्त करा
आरोपीला फाशी झालीच पहिजे
लातुरमध्ये भिम आर्मीसह अनेक सामाजिक संघटनेची एकमुखी मागणी
महाराष्ट्र २४आवाज
उपसंपादक: लक्ष्मण कांबळे
लातूर : १ अक्टोबर रोजी लातुरमध्ये मनिषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळावा म्हणून लातुर गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातुर कँडल मार्च काढण्यात आला व भिम आर्मी कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बहनोके सन्मान मे मी आर्मी मैदान मे योगी और मोदी तानाशाही नाही चलेगी नही चलेगी। योगी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देत लातूरमध्ये योगी सरकारचा जाहीर निषध नोंदवत हाथरस येथील त्यांच्या या संपूर्ण अमानूष कृतीचा लातूर भिम आर्मी संघटने कडून जाहीर निषेध करण्यात आला असून त्या पीडित मनीषा वाल्मिकी बहिणीवर अत्याचार करून जीभ कापून व पाठीच्या मणक्याचे हाड मोडून अत्याचार करणाऱ्या चारही नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, हाथरस येथे डेड बॉडी ही आई-वडिलांना न देता प्रशासनाने स्वतःह तिचे अंत्यसंस्कार केले त्या स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
योगी सरकार आल्यापासून महिलांवर होत असलेले अत्याचार व त्या ठिकाणी वाढलेली गुंडगिरी बघता उत्तर प्रदेश मधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून त्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे तसेच हाथरस ,शहांजापुरा आणि गोरखपुर मध्ये घडलेल्या घटना पासून संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य हादरून गेले असल्याने त्या योगी सरकारला त्वरित बरखास्त करा अशी एकमुखी मागणी भिम आर्मी भारत एकता मिशन लातूर कडून करण्यात येत आहे .
योगी सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगणे ही सध्या काळाची गरज आहे असे भिम आर्मीचे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे यांनी आपले मत व्यक्त केले व जिल्हा प्रमुख विलास चक्रे यांनी योगी सरकारला महिलांचा आदर पूर्वक सन्मान करणे जमत नसलेमूळे राजिनामा देऊन मोकळे व्हावे असे प्रतिपादन केले . जोपर्यंत मनीषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत भिम आर्मी शांत बसणार नाही भिम आर्मीचे प्रदेश संघटक अक्षय धावारे, जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे, जिल्हा संघटक मिलिंद ढगे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, शहर अध्यक्ष बाबा ढगे, शहर महासचिव बबलू गवळे, शहर उपाध्यक्ष आकाश आदमाने, शिवाजी लांडगे, कार्तिक गायकवाड, पवन गायकवाड, विजय चक्रे, अजय टेकांळे, अमोल गेजगे, किरण इंगळे, इश्वर काळे, प्रशांत कदम, राम कसबे, आदर्श उपाध्ये, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर, आंबेडकरी चळवळीचे रघूनाथ बनसोडे, रंजित आचार्य, कांचना वाघमारे, विनोद कोल्हे, अॅड प्रदीपसिंह गंगणे, काँग्रेस अनुसूचित आघाडीचे सचिन गंगावने,
ताहेरभाई सौदागर,काॅम्रेड विश्वंभर भोसले, प्रा. प्रवीण कांबळे, मराठा लिबरेशनचे भिमराव गडेराव, अमोल शिंदे , युथ वॉरीयर्सचे कश्यप सुरवसे, अमित कांबळे आदी आंबेडकरी चळवळ व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.